प्रत्येक प्राण्याच्या शरीराचे एक विशिष्ट तपमान असते. माणसाच्या शरीराचे तपमान सामान्यतः 98.6 फॅरनहीट असते. पण त्यात बदल होऊ लागला की अस्वस्थता जाणवते. शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणीच असते व ह्यामुळे माणसाला ऊब जास्त आवडते. ऊब म्हणजे बाहेरील उष्णतेचा व मायेचा संबंध ! शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो.
शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले की एूकणच जीवनाचेच संतुलन बिघडते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, लघवी कमी होणे, शौचाला-लघवीला जळजळ होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते. पावसाळ्यातही रोगांची जास्ती काळजी घ्यावी लागते पण उन्हाळ्यात जरा जरी निष्काळजी राहिले तरी छोटे मोठे त्रास होण्याचा संभव अधिक असतो.
उन्हाळ्यात वातावरणात खालील लक्षणे दिसू लागतात.
* सूर्याची किरणे प्रखर होतात.
* हवामान गरम होते.
* नैर्ऋत्य दिशेने गरम वारे वाहू लागतात.
* नद्या व इतर प्रवाहांचे पाणी कमी होते.
* झाडांची पाने गळतात. गवत, झुडपे, वेली सुकून जातात.
* जमिनीला भेगा पडतात.
शरीरातील त्रिदोषांची स्थिति –
आधीच्या म्हणजे वसंत ऋतूत वाढलेला कफदोष आपोआप कमी होतो. परंतु हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रुक्ष होते व शरीरात वातदोष साठावयास सुरवात होते.
शरीराची पचनशक्ति –
गरम हवेमुळे जाठराग्नीची पचनशक्ति कमी होते व म्हणूनच भूक फारशी लागत नाही.
ऋतुचर्येचे मुख्य तत्त्व –
स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम् ।
लवणाम्लकटूष्णानि व्यायामं चात्र वर्जयेत् ॥…..चरक सूत्र
मधुर म्हणजे चवीला गोड, थंड, द्रव व स्निग्ध अन्नपान या ऋतूत हितकर आहे तर खारट, आंबट, कडू, व उष्ण अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. व्यायामही अति प्रमाणात करू नये.
उन्हाळ्यात कसे वागावे?
* अगदीच महत्त्वाचे व आवश्यिक काम असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे.
* पातळ व सुती कपडे घालावेत व तेही शक्यतो पांढऱ्या, किंवा फिक्या रंगांचे असावेत.
* बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.
* घरात पंखा, ए.सी. किंवा खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावून, पाणी छाटून थंडावा निर्माण करावा.
* घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.
* शक्यतो गार पाण्याने स्नान करावे व अंगाला चंदन, वाळा, अशा शीत द्रव्यांचे चूर्ण लावावे.
* इतर ऋतूत दुपारची झोप अत्यंत निषिद्ध सांगितलेली असली तरी उन्हाळ्यात अर्धा-पाऊण तास झोप आवश्य्क आहे. रात्र लहान असल्यामुळे झोप तशीही कमी झालेली असते.
* सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे. व सायंकाळी हिरवीगार झाडी असलेल्या बगीच्यात फिरायला अवश्यह जावे.
* रात्री चांदण्यात झोपावे.
* बाहेर उन्हात जाताना लिंबाचे सरबत पिऊन निघावे.
* उष्माघात झाल्यास कांद्याचा रस पाजावा.
* उन्हाळ्यात गुळवेल सत्त्व, प्रवाळ, मोती भस्म, गुलकंद, मोरावळा ह्या औषधींचा खास उपयोग होतो.
* धान्यात तांदूळ, नाचणी, ज्वारी यांचा उपयोग करावा. बाजरी गुणधर्माने उष्ण असल्याने बाजरीचे पीठ वापरायचे झाल्यास त्यात ज्वारीचे पीठ समप्रमाणात मिसळावे व भाकरी करावी.
* दूर्वांचा रस पोटात घेण्यास उत्तम आहे.
* ग्रीष्म ऋतूत मूत्रल दोष उत्पन्न होतात. लघवी अडकणे, किंवा लघवीला आग होणे अशा तक्रारी जाणवतात. अशा वेळी धण्याची पूड काही वेळ पाण्यात भिजवून, खडीसाखर घालून प्यावे.
* औदुंबराचे पाणी किंवा औदुंबराच्या फळाचे सरबत हे उन्हाळी लागल्यास उत्तम औषध आहे.
* उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.
* शरीरातील उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याची सवय असणाऱ्यांना उन्हाळ्यात हा त्रास अधिकच होतो. शरीरातील कडकी दूर करून थंडावा देणारी गुलकंद, प्रवाळ यासारखी औषधे घेतल्यास , कांदा सुंघवल्यास किंवा उगाळलेल्या चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने हा त्रास कमी होतो.
* व्यायामानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर बऱ्याच जणांना खूप घाम येतो. अशा वेळी घामाने भिजलेले कपडे अवश्यल बदलावेत. काखेत घामाचा बॅक्टेरियांशी संबंध आल्याने शरीराला दुर्गंध येऊ लागतो. त्यासाठी कोलन वॉटर ने काखा साफ करून तेथे चंदन, मंजिष्ठा, किंवा टाल्कम पावडर छिडवावी.
* तळपाय व तळहाताची जळजळ होत असल्यास मेंदी वाटून किंवा भिजवून लेप केल्याने किंवा तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय व तळहात घासल्याने दाह कमी होतो.
* आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
* सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
* पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
* कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
* साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
* शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
* काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यण खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
* कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम ! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.
उन्हाळ्याच्या त्रासाला हरवणारा आहार
* तिखट, रुक्ष व खूप गरम गोष्टी खाऊ नयेत.
* दही, लस्सी वर्ज्य समजावी.
* ढोबळी मिरची, कारले, मेथी या भाज्या सहसा वापरू नयेत
* पचावयास जड आणि शरीरात वात वाढवणारे मटार, पावटा, चवळी, हरबरा, छोले, वाल अशी कडधान्ये टाळावीत.
* हिंग, मोहरी, ओवा, तीळ, लाल मिरची, अशी तीक्ष्ण मसाल्याचे पदार्थ वापरू नयेत. चिंच अननस, कच्चा टोमॅटो ही आंबट फळे खाऊ नयेत.
* डाळींचा उपयोग कमी करावा.
* कांदा ग्रीष्म ऋतूसाठी लाभदायक आहे. लसणाची चटणी मात्र खाऊ नये.
* सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
* पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
* कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
* साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
* शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
* काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यन खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
* कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.
उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जाताना सनस्क्रीन क्रीम लावणे सर्वपरिचित असते. मात्र त्याबरोबरीने पुढील उपाय योजता येतात.
स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरण्याने, मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होत असते. उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालणे, फार घट्ट कपडे घालणे टाळणे श्रेयस्कर असते. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात. शरीरातील उष्णता कमी व्हावी, बरोबरीने रक्तशुद्धी व्हावी याताठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम असते.
सूर्य हाच जगाचा तारक आहे. शारीरिक आरोग्यासाठी सूर्य, मानसिक आरोग्यासाठी मोकळेपणा व पारदर्शकता देणारा सूर्य आणि अध्यात्मिक आरोग्यासाठी ज्ञानप्रकाश देणाराही सूर्यच !! उन्हाळ्यात होणाऱ्या थोड्याश्याळ गैरसोयी सोप्या उपायांनी कमी करून सूर्योपासना हाच मानवतेचा तारकमंत्र !!!

घराच्या बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.

उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.

आहारात घरचे साजूक तूप ताजे लोणी यांचा समावेश असणे.

सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आहारात वापर करावा.

पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा





Leave a Reply